स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट करताना निस्वार्थी वृत्तीने केली पाहिजे. स्वार्थ आला की मोह होतो.मोह झाला की दुसऱ्याचं स्वतःचं म्हणायची इच्छा होते.यातून कलह निर्माण होतो. त्यामुळे दुःख येतं. म्हणून मोह करू नये.
एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून अनितीने व्यवहार करू नकोस. कारण नियतीचा फेरा कुणाला चुकत नाही. त्यामुळे इथे केलेले भोग इथेच फेडायला लागणार.त्यामुळे कर्म चांगले करा,आयुष्याचं सोनं होईल.